भारतात प्राचीन काळापासून अनेक तत्त्ववेत्ते होऊन गेले. जीवनाचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या तत्त्ववेत्त्यांपैकी गौतम बुद्ध, चार्वाक, कबीर, मीराबाई, महर्षी योगी अरविंद, जे. कृष्णमूर्ती, विवेकानंद आणि ओशो अशा आठ तत्त्ववेत्त्यांची ओळख माधवी कुंटे यांनी ‘तेजोमय’मधून करून दिली आहे.
वैदिक कर्मकांडातून लोकांची सुटका करून त्यांना जातीभेदरहित चांगले जीवन जगण्याचा मार्ग गौतम बुद्धांनी दाखविला. लोकांना नीतीयुक्त आणि विवेकवादी आचरणाची शिकवण देणारे चार्वाक यांचे तत्त्वज्ञान यात आहे. कृष्णाला आपला सखा, पती मानलेल्या मीराबाई म्हणजे स्त्री स्वातंत्र्याचा हुंकार असल्याचे लेखिका सांगतात. संत मीराबाई म्हणजे मूर्तिमंत भक्तियोग कशा ठरल्या, हे त्यांच्या चरित्रकथेतून समजते.
कर्मकांड आणि कट्टरतेला फटकारणारे संत कबीर, प्रकांड तेजस्वी बुद्धिमत्ता आणि वैदिक आणि वैदिक तत्त्वज्ञानाचे सखोल ज्ञान असणारे विवेकानंद, जे. कृष्णमूर्ती यांचे तत्त्वज्ञान, मानवजात उत्क्रांत व्हायला हवी, हा तत्त्वज्ञानाचा गाभा मांडणारे महर्षी योगी अरविंद, संसारात राहून ध्यानमार्गाने आत्मिक शक्तीचा विकास करीत अखेर मुक्तिलाभाकडे जाण्याचे तत्त्वज्ञान मांडणारे आचार्य रजनीश अशा तत्त्ववेत्त्यांची माहिती व महती यातून कथन केली आहे.
पुस्तक : तेजोमय
लेखक : माधवी कुंटे
प्रकाशक : भरारी पब्लिकेशन्स
पाने : १२८
किंमत : २०० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)